शनिवार, जून २७, २००९

कभी कभी... मेरे दिल में खयाल आता है

मला एक सवय आहे. कुठलं ही काम करायला घेतलं, की त्या कामाच्या परिणामांची एक रूपरेषा माझ्या डोक्यात तयार होते. ते काम कसे व्हावे, त्या कामाचा अंतिम परिणाम कसा असावा, ह्या सगळ्या गोष्टींचा एक निकष तयार होतो. ते काम त्या निकषां प्रमाणे व्हावे ह्या साठी मी प्रयत्न पण करतो. आणि अनेक वेळा प्रयत्न करूनही ते काम त्याठरवलेल्या निकषांपेक्षा कमीच पडतं. पण काम व्यवस्थित पार पडतं. अशा वेळेस मला आपले प्रयत्न कमी पडल्याचंदु: होतं. कदाचित माझे निकष खूप उच्च असतील. ते थोडं-थोडं करत वर नेता, मी कदाचित पहिल्याझटक्यातच स्वतः कडून जास्ती अपेक्षा करत असेन. पण मग आधी पासून अपेक्षा उंचावल्या नाहीत तर कुठेपोहोचायचे आहे, ते कसं कळणार?

असो, मी माझ्याबद्दल असे निकष ठेवत असल्याने, मी इतरांकडूनही काही निकष पूर्ण करण्याची अपेक्षा ठेवतो. माझं हे लिखाण थोडं बुचकळ्यात टाकण्या सारखं असू शकतं, पण हे खरं आहे. उदाहरणार्थ, मी शिक्षक लोकांकडूननवीन गोष्टी उत्साहाने शिकण्याची अपेक्षा ठेवतो. आणि मला असेही वाटते की ते शिक्षक असल्याने, त्यांनी नवीनगोष्टी पटकन आत्मसात कराव्यात. कारण वर्षानुवर्ष तेच विषय शिकवत असल्याने, त्यांचं त्या विषयातील ज्ञानआणि विषयावरील पकड मजबूत होते, असा माझा समज आहे. पण अनेक वेळा हेच शिक्षक, कठीण विषयालाबगल देऊन सोपा मार्ग शोधण्याच्या प्रयत्नात धडपडताना दिसतात. आमचं आता वय झालं हे कारण सांगून तेजवाबदारी झटकण्याचा प्रयत्न करतात. अनेक वेळा तरूण शिक्षकही असलं करताना दिसतात. हे पाहून मन खिन्नहोतं. असं वाटतं की हेच लोकं नवीन पिढी घडवणारे आहेत. आणि नवीन कठीण विषय शिकण्याची ह्यांच्यातचउत्सुकता नसेल, तर विद्यार्थ्यांना
नवीन गोष्टी शिकण्यासाठी हे लोकं कसं प्रवृत्त करणार? त्याही पेक्षा खिन्न करणारी गोष्टं म्हणजे शिक्षक वर्गाचास्वतः कष्ट करून विषय समजून घेण्याचा अनुत्साह. थोडं समजवून दिल्यावर पुढचं तुम्ही करून पहा असं सांगितलंकी लगेच दुसर्या दिवशी हजर होतात. हे समजलं नाही, समजावून सांगा. विचारावं, काय समजलं नाही ते सांगा, तर उत्तर मिळतं काहीच समजलं नाही. सगळं सांगा.

अरे का? थोडे कष्टं घ्या की. तुम्ही पहिल्यांदा धडपडणार, समजायला वेळ लागणार, एका झटक्यासमजणार नाही, हे सर्व स्विकारा. जरा कागदावरून कलम चालवा. जरा डोक्याला चालवा. मग उमजेल सगळं. हेएवढं सगळंसांगावसं वाटतं, पण काय करणार? आम्ही काय ज्ञानेश्वर नव्हे. रेड्या कडून वेद वदवून घ्यायला. सगळ्या जास्तीदु: ह्या गोष्टीचं होतं की हीच मंडळी आपल्या महाविद्यालयात परत जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांवर आपली सत्ताचालवतात. तिकडे त्यांना हजेरी, सबमिशन ह्या गोष्टींवरून हडकवतात आणि मार्कांची भीती दाखवतात.

म्हणूनच कधी-कधी एकांताच्या क्षणी (म्हणजे मी एकटा असताना) असं वाटतं की आपण स्वतः बद्दल एवढे उच्चनिकष का ठेवायचे? आपल्या पेक्षा कमी कष्ट करून सत्ता गाजवणारे लोकं आपलं आयुष्य सुखाने जगत आहेतआणि त्यांचा उदर-निर्वाह सुद्धा व्यवस्थित चालू आहे. त्यांना आयुष्यात इतर काही मिळो अथवा न मिळो, पण असले उच्च निकष गाठण्याचे दडपण तरी बाळगावे लागत नाही. आणि म्हणूनच ते निकष न गाठल्याचे दु:ख पणत्यांना होत नाही. पण असं दुय्यम आयुष्य जगणार्‍यां मुळे ह्या समाजाचं काय होत आहे? आज शिक्षकी पेशा कडेखूप आदराने बघणारी किती लोकं आहेत? किंबहुना इतर काही जमले नाही म्हणून शिक्षक झाला, असं अनेक वेळेला ऐकायला मिळतं. आणि हल्लीच्या शिक्षकांकडे बघून तशी शंका सुद्धा निर्माण होते.

असो, शिक्षक हे एक उदाहरण झालं. अशी अजून बरीच उदाहरणं आहेत. पण मी ह्या बद्दल अजून लिहीत नाही. कारण अशी दुसर्‍यांवर टीका करायला मी काही नोबेल पुरस्कार विजेता नाही. पण कधी-कधी वाटतं की आपले निकष तरचुकत नाहीत ना?
कभी कभी... मेरे दिल में खयाल आता हैSocialTwist Tell-a-Friend

शुक्रवार, जून १२, २००९

आयला, पावसाला कुठे नेला?

हा प्रश्न हवामान खात्याला उद्देशून नसून, पश्चिम बंगाल मधे आलेल्या "आयला" नामक चक्रीवादळाला आहे. हवामान खात्याच्या बातमीनुसार, ह्या चक्रीवादळाने पश्चिम किनारपट्टी वरच्या पावसाळी हवेचीच हवा गुल केली आहे. भारताच्या पूर्व किनार्‍यावर जर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला, तर पश्चिम किनार्‍यावरच्या मानसूनची प्रगती देशाच्या अंतर्गत भागात होते. पण "आयला" मुळे असा पट्टा तयार न झाल्यामुळे, पश्चिमी मानसूनची प्रगती जणू काही थांबलीच आहे. म्हणजे झालं असं की आयलामुळे पूर्व किनार्‍यावरचं तपमान कमी झालं. कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्यासाठी उच्च तपमान आणि शुष्क वातावरण लागतं. चक्रीवादळामुळे तपमानही खाली आलं आणि आर्द्रता सुद्धा वाढली. आता पुन्हा कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्यासाठी थोडा काळ जावा लागेल. त्याशिवाय पश्चिमेकडचा मानसून पुढे सरकणार नाही.

सध्या मानसून रत्नागिरीच्या किनार्‍यावर अडकून पडलाय. त्याला तिकडून पुढे सरकायला अजून एक आठवडा तरी लागेल. कारण साधारणपणे एका आठवड्यानंतर पूर्व किनार्‍यावर कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन पश्चिमी मानसून पुढे सरकेल. हवामान खात्यानुसार आता मुंबईत मानसून जुलई मधेच येईल. म्हणजे अख्खा जून महीना कोरडाच रहाणार.
आयला, पावसाला कुठे नेला?SocialTwist Tell-a-Friend

सोमवार, जून ०८, २००९

स्मारक: महाराजांचे आणि खानाचे

बरेच दिवस ह्या विषयावर लिहायचे केले होते. पण, विसरून जात होतो. उद्धव ठाकरेंच्या कालच्या वर्तमानपत्रातल्या वक्तव्यामुळे ह्याची पुन्हा आठवण झाली. खरं म्हणजे उद्धव ठाकरे माझ्या मनातलेच बोलले. त्यामुळे अजून काय लिहावे तेच कळत नाही. समर्थ, दादोजी आणि गागाभट्टांचा द्वेष करणार्‍यांनी खरं तर आधी उद्धव ठाकरेंच्या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत. त्याशिवाय त्यांनी हा ब्राम्हण द्वेष चालू ठेवण्यात कुठलीच मर्दांगी नाही.

समर्थांनी संभाजी राजेंना पत्र लिहिलं. त्यात त्यांनी संभाजींना राज्य कसं करावं आणि स्वराज्य कसं टिकवावं हे सांगितलं. त्या काव्य पत्रातील शेवटची चार पदं इथे देतोय-

शिवराजास आठवावें । जीवित्व तृणवत् मानावे ॥
इहलोकीं परलोकीं राहावे । कीर्तिरूपें ॥१५॥
शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप ॥
शिवरायाचा आठवावा साक्षेप । भूमंडळीं ॥१६॥
शिवरायांचे कैसें चालणें । शिवरायाचें कैसें बोलणे॥
शिवरायचे सलगी देणें । कैसे असें ॥१७॥
सकळ सुखांचा त्याग । करून साधिजे तो योग ॥
राज्यसाधनाची लगबग । कैसी असे ॥१८॥
त्याहूनि करावे विशेष । तरीच म्हणावे पुरुष ॥
या उपरी विशेष । काय लिहावें ॥१९॥

महाराजांबद्दल एवढे गौरवोद्गार समर्थांनी काढले आहेत. आणि शेवटच्या कडव्यात त्यांनी पुरुष कोणाला म्हणावे हे ही लिहिलं आहे. आता महाराजांच्या कृतिपेक्षा विशेष काही करायला मेटे, चोंदे, गायकवाड आदिंना काही जमलं आहे असं दिसत नाही. त्यामुळे त्यांना 'पुरुष' म्हणावे काय, असा प्रश्न आहे. दुसरं असं, की शिवरायांबद्दल एवढं कौतुक आणि आकलन समर्थांनी केलं आहे, ते काय महाराजांना जवळून जाणल्या शिवाय? दर वर्षी राम-नवमीच्या उत्सवाला महाराजां तर्फे रसद सज्जनगडावर पोहोचवली जायची. महाराजांना समर्थांविषयी आस्था असल्या शिवाय का ही सहायता केली जात होती? ह्याचा ही हे मराठा नेते विरोध करतील.

दुसरं म्हणजे, उद्धव ठाकरे म्हणतात तसं, ह्या मराठा नेत्यांना अफझलखानाची कबर आणि त्याचं दर्ग्यात झालेलं रूपांतर चालतं. ते कुणी तोडायचं बोलत नाही. प्रतापगडाच्या पायथ्याशी हिंदू-मुसलमान दंगे होतात. अफझलखानाचा तथाकथित स्मृतिदिन असला की तिथे तंग वातावरण असतं. तर एवढे वर्ष ह्या मराठा नेत्यांना अफझलखानाचा उदो-उदो होत असल्याचं खटकलं नाही. इतिहासानुसार खान हा संत नसून त्याने तुळजापूर, पंढरपूर, इ. देवळं उध्वस्थ केली, हिंदूना- मग ते ब्राम्हण असो किंवा मराठा- छळलं होतं. तो इतिहास विसरून त्या खानाची कबर आणि त्याचं दर्ग्यात झालेलं रुपांतर ह्या मराठा नेत्यांना कसं खपतं? प्रतापगडावर चाललेला हा तमाशा ह्यांना कसा काय चालतो? दादोजी कोंडदेव आणि समर्थ रामदास हे स्वराज्याच्या विरोधात तरी नव्हते.

थोडक्यात सांगायचे झाले, तर ज्यांनी स्वराज्य घडवून आणले, त्यांचा स्मारकाबद्दल एवढा वाद निर्माण होतोय. आणि जो स्वराज्यावर चाल करून आला, त्याच्या स्मारकाचा दर्गा होऊन तिकडे उरुस वगैरे साजरे होत आहेत. ही हिंदवी स्वराज्याची चेष्टा नाही तर अजून काय आहे?
स्मारक: महाराजांचे आणि खानाचेSocialTwist Tell-a-Friend