गुरुवार, जून १९, २००८

गो मुंबई कार्डाचे सत्य

मुंबईच्या बेस्ट उपक्रमाने आणि पश्चिम मध्य उपनगरीय रेल्वेंनी प्रवाशांच्या सोई साठी एक अभिनव योजना जाहिर केली . ह्या योजने अंतर्गत एक pre-paid कार्ड खरेदी करून ते एकच कार्ड रेल्वे अथवा बसचं टिकिट काढण्यासाठी वापरता येतं . ह्या कार्डाला "गो-मुंबई कार्ड" असे नाव देण्यात आले. वृत्तपत्रांमधे ह्या कर्डाची खूप प्रसिद्धी करण्यात आली. ह्या कार्डामुळे मुंबईकरांना प्रवास किती सोयीचा होईल हे सांगण्यात आले. मुख्य म्हणजे तिकिटाच्या रांगेची कटकट मिटणार होती. आणि त्या शिवाय बस मधे टिकिट काढताना सुटे पैशे बाळगायची गरज उरणार नव्हती. रेल्वेचा प्रवास सुरु करताना सुरवातीच्या स्टेशनला असलेल्या स्मार्ट कार्ड रीडर समोर आपले कार्ड धरायाचे . गंताव्याला पोहचल्यावर तिथून बाहेर पडताना पुन्हा एकदा त्या स्टेशन वरच्या स्मार्ट कार्ड समोर धरायाचे. असं केल्यावर आपल्या कार्डातून प्रवास भाड्याची कपात होते. तसेच बसने प्रवास करताना कंडक्टरला आपले गंतव्य सांगितले की तो तेवढे भाड़े आपल्या कार्डातून वजा करणार.

वृत्तपत्रांमधे ह्या कर्डाची खूप प्रसिद्धी करण्यात आली. दादर सारख्या मोठ्या स्टेशनवर ह्या कार्डाची जाहिरात करायला लोकं नेमली. ह्या लोकांनी पत्रकं वाटून प्रवाशांना "गो मुंबई" कार्डा बद्दल माहिती दिली. ह्या कर्डाची प्रसिद्धी फक्त रेल्वे करताना दिसत होती. बेस्ट वाले असलं काही करताना दिसत नव्हते. तरी ह्या कार्डाचे फायदे वाचून मी ते घ्यायचे ठरवले. त्या प्रमाणे बेस्टच्या एका केंद्रावर गेले असता तिथे कळाले की सध्या हे कार्ड फक्त मध्य रेल्वेवर चालतं. पश्चिम रेल्वेने अजून स्मार्ट कार्ड रीडर बसवलेच नाहीयेत. ते बसवायला अजून एक-दोन महीने जातील. शिवाय हे कार्ड बेस्ट मधे फक्त एका मार्गावर वापरता येतं. थोडक्यात म्हणजे, ते कार्ड फक्त पास म्हणून उपयोगी पडतं. ह्या कार्डाचा बेस्ट मधे टिकिट काढण्यासाठी केव्हा पासून उपयोग करता येईल हे बेस्ट मधल्या लोकांना सुद्धा माहित नाही. थोडक्यात सांगायचे झाले तर मुंबईकरांचा प्रवास सुखाचा होण्यासाठी अजून बराच अवकाश आहे.
गो मुंबई कार्डाचे सत्यSocialTwist Tell-a-Friend

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: