शनिवार, मे ३०, २००९

वाचा आणि गप्प बसा

महाराष्ट्र शासनाने अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचा पुतळा आणि स्मारक बांधायचे ठरवले आहे. त्यासाठी नेहमी प्रमाणे एक समिती नेमण्यात आली आहे. आणि नेहमी सारखं ही सरकारी समिती पण वादाच्य भोवर्‍यात सापडली आहे. पण ह्या वेळेस हा वाद निराळा आहे. ह्या वादने जातीय वळण घेतले आहे आणि महारष्ट्र सरकार त्याबद्दल मूग गिळून गप्प बसलं आहे. मुख्यमंत्रांनी काही विधानं केली आहेत, पण तरीही ह्या वादाला जातीय रंग देणे थांबत नाहीये.

काही मराठा संगठनांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या अध्यक्ष पदी झालेल्या निवडीला विरोध केला आहे. वास्तविक पाहता बाबासाहेबांची निवड ही अध्यक्ष पदी झाली नसून त्यांना सल्लागार म्हणून नेमलं आहे. त्यांची पात्रता नसती तर विरोध ठीक होता. पण शिवाजी महाराजांच्या आयुष्याचा अभ्यास बाबासाहेब पुरंदरे ह्यांचा इतका कोणीच केला नसेल. किंबहुना शिवाजी राजांवर पुरंदरेंचं वाक्य हे शेवटचा शब्द मानला जातो. बरं ह्या मराठा संगठनांचा शिवशाहीरांना विरोध फक्त ते ब्राम्हण आहेत म्हणून आहे. ह्या मराठा संगठनांच्या मते, शिवशाहीरांनी महराजां बद्दल चुकीचा इतिहास पसरवला आहे. त्यांचा मते, दादोजी कोंडदेव हे महराजांचे गुरू नव्हतेच. पण ह्या 'विद्वानांनी' त्या संदर्भात एकही पुरावा दिला नाही. महराजांचे गुरू जर दादोजी नव्हते तर कोण होते? त्यपुढे जाऊन ह्या संगठनांनी तर कहर केलाय. रामदास स्वामी हे महाराजांचे आध्यातमिक गुरू नाही असा त्यांचा दावा आहे. स्वर्गातून पाहत असलेल्या महाराजांना काय वाटत असेल? ह्याच साठी केला होता का अट्टाहास? समर्थांनी दासबोधात असल्या मूर्खांची काय लक्षणं दिली आहेत ते वाचले पाहिजे. म्हणजे हे मराठा इतिहासाचे रक्षण करते समर्थ-संभाजी महाराज ह्यांच्यातला तो प्रसिद्ध पत्रव्यवहारही नाकारायला कमी करणार नाहीत. त्यात तर समर्थांनी शिवरायांचं कौतुकच केलं आहे. आणि त्यांनी संभाजी राजेंना शिवाजींचा आदर्श ठेवायला सांगितलं आहे.

असो, पण पुरोगामी महाराष्ट्रात असे बिनबुडाचे आरोप आणि वक्तव्य करणे आणि जातीयवाद निर्माण करणे हे धोकादायक आहे. आंधळेपणाने ब्राम्हणांचा विरोध करून त्यांना समाजात हिणवणे हे कितपत बरोबर आहे? बाबासाहेब पुरंदरे सारख्या विद्वानांचा काही लोकं वाट्टेल तसा जाहीर पणे अपमान करतात आणि त्याविरोधात सरकार काहीही करत नाही? त्यांनी जितकी वर्ष महाराजांच्या इतिहास संशोधनात घालवली आहेत, तितकी वर्ष ह्या मराठा संगठनांनी हातात पुस्तकं तरी धरली आहेत का? ह्याच मराठा संगठनांच्या अज्ञानी हट्टाला दुजोरा देत महाराष्ट्र सरकारने ह्या वर्षीचा दादोजी कोंडदेव पुरस्कार अजून जाहीर केला नाही. काही छुटपुट संगठनांपुढे राज्य शासन एवढं हतबल झालं? शिवाजी महाराजांवरून हे असलं राजकारण करायचं आणि जातीद्वेष करायचा? पुरंदरेंनी जर चुकीचा इतिहास लिहिला आहे, तर बरोबर इतिहास कुठे आहे? आणि त्या इतिहासाला दुजोरा देणारी टिपणं आणि कागदपत्र कुठे आहेत? ह्या संगठनांनी नुसताच ओरडा आरडा न करता पुराव्यानिशी पुरंदरेंना चुकीचे ठरवून दाखवावे. नाहीतर त्यांनी आपल्या खाक्या उगीच दाखवू नयेत. बाबासाहेब पुरंदर्‍यांनी, एका सज्जन माणसाला शोभेल असं वागून काहीही प्रतिक्रिया दिली नाहीये. पण त्यांच्या गप्प बसल्याचा फायदा ह्या संगठनांनी घेऊन त्यांचावर वाट्टेल ते आरोप लादणं सुरुच ठेवलं आहे.

आणि ह्या सगळ्या गोष्टींवर आपण जनतेने काय करायचं? राज ठाकरेंना कुस्तीसाठी बोलवून हा प्रश्न सोडवायचा असल्या मार्गाचा प्रस्ताव करणारे अनंत चोंदे आणि प्रवीण गायकवाड ह्यांचे काय करावे? आपण हे सगळं वाचून केवळ गप्प बसायचं का?
वाचा आणि गप्प बसाSocialTwist Tell-a-Friend

शनिवार, मे २३, २००९

ट्रक सुभाषितं

खरं तर मला बस, गाडी, इत्यादि पेक्षा रेल्वेने प्रवास करायला आवडतं. एकतर ट्रेन मनात येईल तिकडे थांबत नाही. दुसरं म्हणजे त्यांच्या पॅन्ट्री कार मधून वेळो-वेळी काहीतरी खायला-प्यायला येत असतं. त्यामुळे भूक लागली तर कुठल्याही हॉटेल अगर ढाब्याची वाट न बघता पाहिजे तेव्हा खाता येतं.

पण बस किंवा कारने प्रवास करायचा झाला, की मला एक वेगळी मजा वाटते. आणि विशेष म्हणजे मला ट्रकच्या मागे लिहिलेल्या पाट्या वाचण्यात एक विशिष्ट आनंद मिळतो. ट्रकच्या पाठीवर अनेक सुभाषितं आणि बहुजन हिताय असे संदेश दिसतात. त्यात काही एकदम मजेशीर देखील असतात. खरं म्हणजे माझं ह्या विषयात फार काही संशोधन नाही. कारण मी ट्रक मागच्या सुभाषितांची नोंदणी कधी केली नाही. तरी पण ही झलक समजावी. ट्रकच्या मागील बाजूस आढळलेल्या काही पाट्यांचा हा एक नमूना आहे-

१. कंडोम वापरा, एड्स टाळा. ह्या संदेशा बद्दल आम्ही असं ऐकलं होतं की सरकार तर्फे हा संदेश चिकटवल्याचे काही तरी इनाम रक्कम मिळते. त्यामुळे आमच्या पैकी काही जणांच्या मनात आपापल्या मोटरसायकलवर हा संदेश चिकटवण्याचा विचार आला होता.

२. सौ में से ९९ बेईमान, फिरभी मेरा भारत महान. देशातील सत्य परिस्थिती कथन करणारा महानुभाव. पण एकतरी सत्यवादी अजून भारतात उरलाय, ह्याचं आपल्याला समाधान वाटू देणारा अनेक ठिकाणी दिसतो.

३. जलो, मगर दिये की तरह. Turning threats into opportunities असा महत्वाचा व्यवस्थापकीय सल्ला देणारा.

४. आई-वडीलांचा आशीर्वाद, आईची पुण्याई वगैरे लिहिणारे आधुनिक श्रावण बाळ सुद्धा असतात.

५. मी पळतो, तू का जळतो? असं सांगून आपल्याला षडरिपुंपैकी एकाची आठवण करून देणारा भेटतो.

ह्याहून जास्ती काही मला सध्या आठवत नाहीत. पण आठवली, किव्हा नवीन दिसली, तर ती संग्रहीत करून ह्या लेखाचा दुसरा भाग म्हणून प्रसिद्ध करीन. दरम्यान, वाचकांना काही पाट्या माहीत असतील, तर त्यांनी त्याची नोंद टिप्पणीं मधे करावी. अश्या टिप्पण्या ह्या लेखाचा पुढील भाग म्हणून वाचकांच्या नावा सकट प्रसिद्ध करण्यात येईल.
ट्रक सुभाषितंSocialTwist Tell-a-Friend