शुक्रवार, मार्च १९, २०१०

पधारो म्हारे देस!!

नुक्तचं आपल्या केंद्रीय मंत्री मंडळाने परदेशी शैक्षणिक संस्था (कार्य नियमन, गुणवत्ता टिकवणे आणि व्यवसायीकरण निर्बन्धन) ह्या विधेयकाला मंजुरी दिली. ह्यामुळे परदेशी शैक्षणिक संस्थांना भारतात आपलं स्वतःचं स्वतन्त्र प्रांगण स्थापन करता येईल आणि स्वतःचे शैक्षणिक अभ्यासक्रम राबवता येतील. अजून हे विधेयक लोकसभा आणि राज्यसभा मधे मंजूर व्हायचे आहे, पण आता पासूनच ह्या विधेयकाचे गुणगान गायला सुरुवात झालेली आहे. आपले माननीय मनुष्यबळ विकास मंत्री तर ह्याला दूरध्वनी क्षेत्रातल्या क्रान्तीच्या समान दर्जा देऊन मोकळे झाले आहेत. काय तर म्हणे ह्या विधेयकाच्या मंजूरी नंतर शैक्षणिक क्षेत्रात एक वेगळीच क्रांती घडेल आणि त्यात फक्तं विद्यार्थ्यांचा फ़ायदा होणार.

तो कसा? तर आता उच्च गुणवत्ता असलेली परदेशी विद्यापीठं इथे भारतात येतील आणि त्यांच्या इथे असलेले उच्च दर्ज्याचे अभ्यासक्रम इथे राबवतील. म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जयाचे शिक्षण घेता येईल. आणि हो, ह्या विद्यापीठांना नफेखोरी करण्या पासून रोखण्यासाठी ह्या विधेयकात व्यवस्थीत तरतूद करण्यात आली आहे. म्हणून तुम्ही अवाढव्य फीची चिंता नका करू. ती जर तुम्हाला तशी वाटली तर लक्षात घ्या की पाल्याला परदेशी पाठवलं असतं तर ह्यापेक्षा कैक अधिक पटीचा खर्चं झाला असता. शिवाय विद्यार्थ्यांनी आपल्या कडे पाठ वळवू नये, म्हणून इथली स्थानिक विद्यापीठं आणि महाविद्यालयं सुद्धा आपला दर्जा सुधारण्याचा कसोशीने प्रयत्न करतील. म्हणून तुमच्या पाल्याला जरी ह्या परदेशी विद्यापीठात प्रवेश नाही मिळाला तरी, इथल्या सुधारलेल्या महाविद्यालयात त्याला अभ्यास करायला मिळेल. म्हणजेच डबल फायदा. पण, शासनाचा हां उद्देश्य किती सफल होईल?

ह्यासाठी आपण इतिहासात जरा मागे जाऊ. १९८३ साली अशीच शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवण्याच्या उद्देश्याने महाराष्ट्र सरकारने खाजगी संस्थांना अभियांत्रिकी महाविद्यालयं चालवण्याची अनुमती दिली व तसा कायदा पण केला. पण ह्यामुळे शिक्षण क्षेत्रात कसली क्रांती झाली हे तुम्हा-आम्हा सर्वांना माहीत आहे. खाजगी महाविद्यालयाताल्या शैक्षणिक सोई, तिथल्या प्राध्यापकांचा दर्जा आणि विद्यार्थ्यां बरोबर हिटलर सारखं त्यांचं वागणं हे जग-जाहीर आहे. विद्यार्थी त्यांच्या मना प्रमाणे वागले नाहीत, तर इन्टरनल किंवा प्रात्यक्षिकेत कमी गुण देण्याची धमकी सर्रास पणे दिली जाते. आणि ह्या खाजगी महाविद्यालयां मधे कुठले अभ्यासक्रम घेतले जातात? पदवीचे त्या वेळेस मागणीत असलेलेच कार्यक्रम अनेक महाविद्यालयं चालू करतात. कुठेही जाऊन बघा. संगणक अभियांत्रिकी, ऋणाणुशास्त्र (electronics) अभियांत्रिकी, एम बी ए असलेल्या महाविद्यालयांचा सुळसुळाट झाला आहे. पण यांत्रिकी, रसायन, स्थापत्यशास्त्र शिकवणारी महाविद्यालयं खूप कमी प्रमाणात दिसतात.

दुसरं असं की ह्या महाविद्यालायां मधे फक्त पदवीचे अभ्यासक्रम शिकवले जातात. महाराष्ट्रात असलेल्या किती खाजगी महाविद्यालयांमध्ये चांगल्या दर्ज्याचा पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवला जातो? खूपच कमी, किंबहुना नाहीच. आणि संशोधन तर कुठल्याच महाविद्यालयात होत नाही. समोर एवढे सगळे प्रश्न आहेत की खाजगी महाविद्यालयांनी शैक्षणिक क्षेत्रात काय क्रांती घडवली आहे? उलट ही महाविद्यालयं ज्या संस्थांनी चालू केली आहेत, फक्त त्यांचचं भलं झाले आहे.

हा एवढा डोळ्या समोर अनुभव असताना सरकारला अजून कसली दिवा स्वप्नं बघायची आहेत? ह्या विधेयकाच्या मंजूरी नंतर स्पष्ट आहे की ज्या अभ्यासक्रमाला भारतात अधिक मागणी आहे, केवळ तेच इथे आणले जातील. आणि ते घेऊन येणारी विद्यापीठं सुद्धा जागतिक दर्जाची असतील ह्याची काहीही ग्वाही देता येत नाही. उलट एक तयार बाजारपेठ मिळाली म्हणून ब-दर्ज्याची विद्यापीठं येण्याचा धोका अधिक आहे. कारण ह्या विधेयकात विद्यापीठाचा आपल्या माय-देशाताला दर्जा बघून इथे यायची अनुमती देण्याची तरतूद नक्कीच नसणार. अमेरीकेत शिक्षणाचं जसं बाजारीकरण झालंय तसच इथे सुद्धा होईल. किती विद्यापीठं आपलं cutting-edge research इथे भारतात आणतील? आणि त्यांना आपल्या देशात जसे projects मिळतात तसेच तिथल्या कंपन्या इथल्या प्राध्यापकांना देतील का? ह्याची उत्तरं द्यायचा कोणीही प्रयत्न केलेला नाही. तरी त्यांना इथे आणायची भलतीच घाई झाली आहे.

तरी सुद्धा आपल्या देशात परदेशी विद्यापीठांच्या स्वागता साठी पायघड्या घालून अनेक लोक उभे रहातील. कारण जे भारतीय ते गौण आणि जे परदेशी ते उच्च असं मानणारी अनेक लोकं अजूनही भारतात आहेत. शिवाय ह्या सगळ्या धांदलीत आपले खीसे भरण्याची वाट बघणारे सुद्धा असतीलच की. हे सगळे मिळून ह्या परदेशी विद्यापीठांना म्हणतीलच पधारो म्हारे देस!!
पधारो म्हारे देस!!SocialTwist Tell-a-Friend

रविवार, मार्च १४, २०१०

हुज्जत: चुकीचे ठिकाण की अक्कल गहाण: भाग १

"एकदम मस्त होता ना सिनेमा? बर्‍याच दिवसांनी एवढा चांगला सिनेमा पाहिला." त्याच्या दिशेने किंचीत मान झुकवून आणि चेहर्‍यावर एक हलकं स्मित आणित ती म्हणाली. तिच्या वाढदिवसाचं निमित्त साधून दोघांनी मल्टीप्लेक्स मधे सिनेमा बघायचं ठरवलं. वास्तविक पाहता त्याला मल्टीप्लेक्स मधे चित्रपट पहायला अजिबात आवडत नाही. एका चित्रपटावर ५००-६०० रुपये खर्च करणे त्याला कधीच पटलं नव्हतं. म्हणून तो फक्त विजय किंवा अलका मधे चित्रपट बघायचा. म्हणूनच आजचा बेत कळल्यावर तिला आश्चर्याचा धक्काच बसला होता. तिच्या आनंदासाठी त्याने आपल्या व्यवहारी मनाला मुरड घातली होती. आणि म्हणूनच ती काहीही न बोलता त्याच्या बरोबर गेली होती. चित्रपटगृहाजवळ येई पर्यंत तिला "आपण कुठला सिनेमा बघणार" हे सुद्धा विचारायचं लक्षात आलं नाही.

तिचं ते हसरं आणि समाधानी रूप मनात साठवत तो तिला म्हणाला, "हो, खरच खूप छान होता सिनेमा. हल्ली चांगले मराठी चित्रपट यायला लागले आहेत. एवढे पैसे खर्च करावे लागले त्याचं काहीही वाटत नाही. हा चित्रपट पूर्णपणे पैसा वसूल होता." तिची ही मुद्रा एकदम घायाळ करणारी होती. अशा मंद स्मिताने तिने त्याचं भान अनेक वेळा हरपवलं होतं. आणि त्याला समाधानी पाहून तिला अजूनच आनंद झाला. खरं तर तो छोट्या-छोट्या गोष्टींवर समाधानी होणारा. अगदी चहातली साखर योग्य प्रमाणात आहे, हे लक्षात आलं तरी त्याच्या चेहर्‍यावर तीच समाधानाची भावना यायची. भानावर येत, तो म्हणाला, "चल, आज चायना इन द टाऊनला जेवायला जाऊ. तुझा वाढदिवस आहे, घरी जाऊन तेच खाण्यापेक्षा आज जरा वेगळं जेवू." तिला अजूनच धक्का बसला. रविवार सकाळी ब्रेकफास्ट बाहेर करायचा म्हंटलं तर तो तिला समोरच्या दर्शनी मधे घेऊन जायचा. लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तो तिला बेडेकर कडे मिसळ खायला घेऊन गेला. त्याच्या ह्या व्यवहारिक विचारांमुळे "रोमांस" ला फार चांस नव्हता. भावनेपेक्षा उपयोगितावर त्याचा जास्ती भर. म्हणून तिला भेट म्हणून चॉकलेटं, अत्तर, इ. न मिळता पुस्तकं, दुचाकीचं हेल्मेट, वगैरे असल्या गोष्टी मिळाल्या होत्या. "काय, आज स्वारी भलतीच खूष दिसतेय?" धक्क्यातून सावरत तिने विचारलं. "नवीन प्रोपोझल्स पास झाली की काय?" "नाही गं, मागे एकदा रोहन म्हणाला होता की चायना इन द टाऊन एकदम भारी हॉटेल आहे म्हणून. म्हंटलं तुझ्या वाढदिवसाची ट्रीट तिकडे द्यावी." "चल तर मग, लवकर गाडी काढ नाहीतर तिकडे गर्दी होईल, मग वेटींग झालं की तूच वैतागशील," गाडीतला रेडीओ लावताना तिने त्याला सांगितलं.

माणसाला आयुष्यात दैव, लक्ष्मी रोडवर पार्किंगचा त्रास आणि हॉटेलचं वेटींग, कधीच चुकत नाही. ह्या दोघांच्या बाबतीतही तेच झालं. तो गाडी पार्क करून येई पर्यंत तिने त्याला सांगितलं, "१५-२० मिनिटं तरी लागतील असं आतल्या माणसाने सांगितलं आहे. चल इथेच बाहेर बसू. इथे बसायची सोय तरी चांगली आहे." बाहेर "वेटींग" साठी सजवलेल्या कोचावर बसून दोघेही पारदर्शक काचेतून आतले नाट्य बघत बसले.

"मी जरा फ्रेश होऊन येते." बोलता-बोलता ती म्हणाली. "हूं, चालेल." तो म्हणाला. ती आत गेली आणि तो समोरच्या रस्त्यावरची वर्दळ न्याहळीत बसला. ही त्याची आवडती हौस! रस्त्यावरची वर्दळ आणि घटना पाहून स्वत:च्या डोक्यात त्या बद्दल अंदाज बांधत बसायचे. म्हणजे एखादी काकू भाजी वाल्याशी कुठल्या प्रकारे हुज्जत घालते, त्यावरून ती घरी सासूशी कसं वागत असेल, ह्याचा तर्क बांधायचा, किंवा एखादी तरुणी स्वत:ला गाडीवरून उतरून ज्या पद्धतीने सावरते, त्यावरून ती तिर्थरुपांच्या पैश्याची किती कदर करते, इ. अनेक प्रकारचे तर्क जुळवत बसायचे. हे तर्क बरोबर आहेत की नाही, ह्याची पारख करणं अर्थातच अशक्य. समोरच्या पदपथावर एक मुलगी बसली होती. तिच्या अवती-भवती तिने तिचं "दुकान" मांडलं होतं. गजरे आणि धूप-उदबत्त्या विकत बसली होती. बहुदा आज धंदा मंदा असावा. नाहीतर ही पोर एवढ्या उशीरा पर्यंत कशाला बसेल? त्याची अंदाज-पंची लगेच चालू झाली. तिच्या "दुकाना"वर येणार्‍या-जाणार्‍या लोकांना त्याने पारखायची सुरवात केली.

"काय रे? एवढं तल्लीन होऊन काय बघतोयस? की कुणाकडे बघतोयस?" ती त्याच्या मागे येऊन उभी राहिली. "हां, बरीच फ्रेश दिसतेस! वॉशरूम मधे पूर्ण वॉश केलंस की काय स्वत:ला?" मिश्किलपणे त्याने विचारलं. "तिकडे बघ, ती रस्त्याच्या पलीकडे बसलेली मुलगी पाहिलीस? एवढ्या उशीरा ती सामान विकत बसली आहे. चल जाऊन बघू." "अरे, कशाला? तिचं दिवसाचं ‘टार्गेट’ साध्य झालं नाही, म्हणून बसली असेल." एरवी त्याच्या स्वभावाला शोभणारं कोटि-युक्त वाक्य तिने टाकलं.

क्रमश:
हुज्जत: चुकीचे ठिकाण की अक्कल गहाण: भाग १SocialTwist Tell-a-Friend

रविवार, मार्च ०७, २०१०

एम. एफ. हुसैन बद्दल एवढा पुळका का?

गेल्या आठ-दहा दिवसात कधीतरी, सुप्रसिद्ध (की कुप्रसिद्ध) चित्रकार एम. एफ. हुसैनने आपलं भारतीय नागरिकत्व झिडकारून कतारचं नागरिकत्व स्विकारलं. त्यांना, म्हणे, कतारच्या शेखा (म्हणजे सौ. शेख) ने खुश होऊन तिथलं नागरिकत्व बहाल केलं. लागलीच भारतातल्या उदारमतवाद्यांनी आणि तथाकथित धर्मनिरपेक्ष-वाद्यांनी गळा काढला. हा दिवस भारतीय इतिहासात काळ्या अक्षराने लिहावा असा आहे, अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा पराभव, धर्मनिरपेक्ष सरकार धर्मांधां पुढे झुकलं वगैरे बोंबलायला सुरू केलं.

हुसैनला भारत सोडून बाहेर निर्वासित परिस्थितीत का रहावं लागलं ह्याचं कारण बहुतेकांना माहितच आहे. त्यांनी अनेक भारतीय देवींची नग्न स्वरूपात चित्र काढली. त्याचं उदाहरण ह्या संकेतस्थळावर मिळेल. पार दुर्गा पासून भारतमाता पर्यंत. त्यांच्या ह्या चित्रांमधल्या सगळ्या स्त्री रेखाटणांचे नितंब स्पष्ट दिसत आहेत. पण त्याच हुसैन नी आपल्या आईचं चित्र काढताना तिला संपूर्ण पणे व्यवस्थित झाकलं आहे. त्यांनी अजून एक चित्र काढलं आहे. पूर्ण कपडे घातलेला मुसलमान आणि त्याच्या शेजारी एक नग्न ब्राम्हण.

हे सगळं कशा साठी? त्यांच्या असल्या चित्रांनी हिंदूंच्या भावना दुखवल्या जाणं सहाजिकच आहे. पण वागळेंच्या IBN-लोकमत वाहिनी वर चर्चा करताना भाग घेणार्‍यां पैकी एकाचं मत असं पडलं की फक्त विकृत मानसिकतेच्या लोकांच्या भावना दुखावलेल्या आहेत. अरे आमच्या देवतांचं वाट्टेल तसं विडंबन करता आणि वर म्हणता की विरोध करणारे विकृत आहेत. लाज कशी नाही वाटत. आणि जेव्हा त्या यूरोपीय व्यंगचित्रकाराने पैगंबराचे व्यंगचित्र काढले, तेव्हा इथे आतंक माजवणार्‍या मुसलमानांना तुम्ही हीच गोष्ट का नाही सांगितली? तेव्हा मात्र त्यांची दाढी कुरवाळायला गेलात ना? असं करून धार्मिक भावना दुखावू नयेत. मुसलमान आधीच त्रस्त आहेत ११ सप्टेंबर मुळे, वगैरे.

अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्यांचं मत असं की त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करायचा पूर्ण अधिकार आहे. अरे चांडाळांनो, तुमच्या आईचं नग्न चित्र काढलेलं चाललं असतं का तुम्हाला? हुसैनला जर अभिव्यक्तिचं स्वातंत्र्य आहे तर त्याने त्याचा मिनाक्षी: टेल ऑफ थ्री सिटीज चित्रपट प्रदर्शनातून मागे का घेतला? काही मुसलमानांनी तेव्हा आरडा-ओरडा केला की त्या चित्रपटात नायिकेचं सौंदर्य व्यक्त करण्यासाठी जी विशेषणं वापरली आहेत ती पैगंबराच्या कन्येची नावं आहेत. म्हणून त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. आणि हुसैने गप्पपणे चित्रपट प्रदर्शन बंद करतो म्हणून ग्वाही दिली. तेव्हा हे धर्मनिरपेक्षतेचे पुरस्कर्ते कुठे लपले होते? आणि अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्यांनी त्या वेळेला मूग गिळून गप्प बसणं का पसंत केलं? ह्याची उत्तरं कुणीही देत नाही. आणि असले प्रश्न विचारले की वागळे काका "कमर्शियल ब्रेक" ची घोषणा करतात. खानाच्या वधाच्या चित्रावरून जेव्हा दंगल घडली तेव्हा हिंदूंच्या आणि सत्याच्या बाजूनी उभं रहायला ह्यांच्या पैकी कुणीच का नाही आलं?

ह्या सगळ्या घटनांची साखळी बघता हुसैनचं खरतर भारतीय नागरिकत्व आधीच रद्द करायला पाहिजे होतं. पण नाही. हिंदूंची उपेक्षा करणं आणि मुसलमानांची दाढी कुरवाळणं ह्यालाच तर धर्मनिरपेक्षता म्हणतात. आणि हिंदूंनी आपल्या धार्मिक भावना व्यक्त केल्या तर ते मूळतत्ववाद ठरतं. खिलाफतीच्या आंदोलनापासून सावरकरांना जी भिती होती तेच घडतय. पण जागरूक आणि विचारवंत आणि अभिमानी हिंदूंनी शांत चित्ताने विचार करावा, म्हणजे त्यांच्या ही लक्षात येईल की हुसैन ने खरच आपल्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या बद्दल आपुलकी बाळगायची आपल्याला काहीही गरज नाही.

अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा अधिकार असला तरी प्रत्येक अधिकारा बरोबर कर्तव्य जोडलेली असतात. कुणाच्याही धार्मिक भावना दुखावू नये, हे हुसैनचं कर्तव्य आहे. त्याचा ह्या लोकांना विसर का पडतो? आणि आता कतार मधे ते हा अधिकार वापरून पैगंबराच्या बायकोचं त्याच्या मुलीचं नग्न चित्र काढून त्याची प्रदर्शनं भरवतात का ते बघू!
एम. एफ. हुसैन बद्दल एवढा पुळका का?SocialTwist Tell-a-Friend

गुरुवार, मार्च ०४, २०१०

हिंदी भाषे बद्दल थोडसं

महाराष्ट्रात कोणीही हिंदी भाषे बद्दल ब्र काढला की दोन्ही सेना-इतर नेते मंडळीं पासून क्रीडापटू, गायक, वादक, प्रसार माध्यमं, तथा कथित उच्च वर्गीय, प्रगट लोकं इथपासून, ज्यांना मराठी अजिबात बोलता येत नाही हे सर्व लोक हिंदी आपली राष्ट्र भाषा आहे, आणि आपण जर तिला विरोध केला तर तो देश द्रोह ठरतो असं भासविण्याचा एक प्रयत्न करत असतात. त्यात प्रसार माध्यमं तर इतका अतिरेक करतात की काही नाही तर त्यांच्या ह्या प्रसारानेच तंग वातावरण निर्माण होईल.

पण जे हिन्दी राष्ट्र भाषा आहे हे बोलून अथवा लिहून दाखवतात त्यांना खोटी माहिती पसरवल्या बद्दल आपण न्यायालयात देखील खेचू शकतो. कारण मुळात भारतीय संविधानाने हिन्दीला राष्ट्र भाषेचा नव्हे तर व्यवहाराची भाषा असा दर्जा दिला आहे. भारतातल्या २८ राज्य आणि ७ केंद्र-शासित प्रदेशां पैकी केवळ १० राज्य आणि २ केंद्र-शासित प्रदेशां मध्ये हिन्दी त्यांची अधिकृत भाषा आहे. म्हणजे ५०% पेक्षा ही कमी राज्य ह्या भाषेला आपल्या व्यवहारा साठी वापरतात.

भारतीय संविधानाने हिन्दीला सरकारी व्यवहाराची अधिकृत भाषा म्हणून दर्जा दिलेला आहे. केंद्र सरकारच्या अंतर्गत असलेल्या कार्यालयां मध्ये हिन्दीच्या वापराला प्रोत्साहन दिले जाते. पण ह्या गोष्टीला तमिलनाडू राज्य अपवाद आहे. तिकडे पाठवण्यात येणारी अधिकृत कागद-पत्र इंग्रजी भाषेतच असली पाहिजेत. याला कारण असं की तमिल नाडू मधे झालेल्या हिन्दी विरोधी दंगली आणि निदर्शनं। त्यावेळी केंद्र सरकार ह्या अतिरेकी हिन्दी विरोधीं पुढे नमलं ते कायमचं. पण हे पुढारी, प्रसार माध्यमं आणि भारताच्या एकते विषयी पुळका असलेले लोकं ह्या विषमतेवर कधीही ब्र काढताना दिसत नाहीत. आजही तमिल नाडू मधे केंद्र सरकारच्या निधीतून बांधलेल्या महामार्गां वरील हिन्दीतले फलक काळ्या रंगाने फासून ठेवले आहेत। ही त्यांची हिन्दी-विरोधी मानसिकता नाही तर दुसरं काय?

महाराष्ट्राने हिन्दी भाषेचा कधीही विरोध केला नाही. तमिल नाडूतल्या भाषाप्रेमीं सारखचं आम्हाला सुद्धा आमची भाषा वापरायची आहे आणि मराठी-इतर जनतेला टी वापरण्यास प्रेरित करायचं आहे. त्यामुळे उद्या जर कोणी हिंदीला राष्ट्र भाषा म्हंटलं, तर संविधानाचा अपमान केल्या बद्दल त्यांच्या वर खटला भरण्याची त्यांना ताकीद द्या.
हिंदी भाषे बद्दल थोडसंSocialTwist Tell-a-Friend