शनिवार, जून २७, २००९

कभी कभी... मेरे दिल में खयाल आता है

मला एक सवय आहे. कुठलं ही काम करायला घेतलं, की त्या कामाच्या परिणामांची एक रूपरेषा माझ्या डोक्यात तयार होते. ते काम कसे व्हावे, त्या कामाचा अंतिम परिणाम कसा असावा, ह्या सगळ्या गोष्टींचा एक निकष तयार होतो. ते काम त्या निकषां प्रमाणे व्हावे ह्या साठी मी प्रयत्न पण करतो. आणि अनेक वेळा प्रयत्न करूनही ते काम त्याठरवलेल्या निकषांपेक्षा कमीच पडतं. पण काम व्यवस्थित पार पडतं. अशा वेळेस मला आपले प्रयत्न कमी पडल्याचंदु: होतं. कदाचित माझे निकष खूप उच्च असतील. ते थोडं-थोडं करत वर नेता, मी कदाचित पहिल्याझटक्यातच स्वतः कडून जास्ती अपेक्षा करत असेन. पण मग आधी पासून अपेक्षा उंचावल्या नाहीत तर कुठेपोहोचायचे आहे, ते कसं कळणार?

असो, मी माझ्याबद्दल असे निकष ठेवत असल्याने, मी इतरांकडूनही काही निकष पूर्ण करण्याची अपेक्षा ठेवतो. माझं हे लिखाण थोडं बुचकळ्यात टाकण्या सारखं असू शकतं, पण हे खरं आहे. उदाहरणार्थ, मी शिक्षक लोकांकडूननवीन गोष्टी उत्साहाने शिकण्याची अपेक्षा ठेवतो. आणि मला असेही वाटते की ते शिक्षक असल्याने, त्यांनी नवीनगोष्टी पटकन आत्मसात कराव्यात. कारण वर्षानुवर्ष तेच विषय शिकवत असल्याने, त्यांचं त्या विषयातील ज्ञानआणि विषयावरील पकड मजबूत होते, असा माझा समज आहे. पण अनेक वेळा हेच शिक्षक, कठीण विषयालाबगल देऊन सोपा मार्ग शोधण्याच्या प्रयत्नात धडपडताना दिसतात. आमचं आता वय झालं हे कारण सांगून तेजवाबदारी झटकण्याचा प्रयत्न करतात. अनेक वेळा तरूण शिक्षकही असलं करताना दिसतात. हे पाहून मन खिन्नहोतं. असं वाटतं की हेच लोकं नवीन पिढी घडवणारे आहेत. आणि नवीन कठीण विषय शिकण्याची ह्यांच्यातचउत्सुकता नसेल, तर विद्यार्थ्यांना
नवीन गोष्टी शिकण्यासाठी हे लोकं कसं प्रवृत्त करणार? त्याही पेक्षा खिन्न करणारी गोष्टं म्हणजे शिक्षक वर्गाचास्वतः कष्ट करून विषय समजून घेण्याचा अनुत्साह. थोडं समजवून दिल्यावर पुढचं तुम्ही करून पहा असं सांगितलंकी लगेच दुसर्या दिवशी हजर होतात. हे समजलं नाही, समजावून सांगा. विचारावं, काय समजलं नाही ते सांगा, तर उत्तर मिळतं काहीच समजलं नाही. सगळं सांगा.

अरे का? थोडे कष्टं घ्या की. तुम्ही पहिल्यांदा धडपडणार, समजायला वेळ लागणार, एका झटक्यासमजणार नाही, हे सर्व स्विकारा. जरा कागदावरून कलम चालवा. जरा डोक्याला चालवा. मग उमजेल सगळं. हेएवढं सगळंसांगावसं वाटतं, पण काय करणार? आम्ही काय ज्ञानेश्वर नव्हे. रेड्या कडून वेद वदवून घ्यायला. सगळ्या जास्तीदु: ह्या गोष्टीचं होतं की हीच मंडळी आपल्या महाविद्यालयात परत जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांवर आपली सत्ताचालवतात. तिकडे त्यांना हजेरी, सबमिशन ह्या गोष्टींवरून हडकवतात आणि मार्कांची भीती दाखवतात.

म्हणूनच कधी-कधी एकांताच्या क्षणी (म्हणजे मी एकटा असताना) असं वाटतं की आपण स्वतः बद्दल एवढे उच्चनिकष का ठेवायचे? आपल्या पेक्षा कमी कष्ट करून सत्ता गाजवणारे लोकं आपलं आयुष्य सुखाने जगत आहेतआणि त्यांचा उदर-निर्वाह सुद्धा व्यवस्थित चालू आहे. त्यांना आयुष्यात इतर काही मिळो अथवा न मिळो, पण असले उच्च निकष गाठण्याचे दडपण तरी बाळगावे लागत नाही. आणि म्हणूनच ते निकष न गाठल्याचे दु:ख पणत्यांना होत नाही. पण असं दुय्यम आयुष्य जगणार्‍यां मुळे ह्या समाजाचं काय होत आहे? आज शिक्षकी पेशा कडेखूप आदराने बघणारी किती लोकं आहेत? किंबहुना इतर काही जमले नाही म्हणून शिक्षक झाला, असं अनेक वेळेला ऐकायला मिळतं. आणि हल्लीच्या शिक्षकांकडे बघून तशी शंका सुद्धा निर्माण होते.

असो, शिक्षक हे एक उदाहरण झालं. अशी अजून बरीच उदाहरणं आहेत. पण मी ह्या बद्दल अजून लिहीत नाही. कारण अशी दुसर्‍यांवर टीका करायला मी काही नोबेल पुरस्कार विजेता नाही. पण कधी-कधी वाटतं की आपले निकष तरचुकत नाहीत ना?
कभी कभी... मेरे दिल में खयाल आता हैSocialTwist Tell-a-Friend

२ टिप्पण्या:

Jojo म्हणाले...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
Jitin म्हणाले...

swat baddal nikash thevun aapan aplya samadhanachi seema tharavat asto na.. tyamule swat chya samadhana sathi ase nikash thevayla ch pahijet.. karan tya tun milnara anand fakta aaplyalach milel..
Asach watla mhanun bollo.. baki kahi nahi..