शुक्रवार, फेब्रुवारी १६, २००७

बडीशेप

बहुतेक भारतीय घरांत जेवणानंतर बडीशेप किंवा सुपारी (भाई लोकांना देतात ती नव्हे) खाण्याची एक परंपराच आहे. त्यात बडीशेप अधिक लोकप्रिय आहे. किंबहुना बडीशेप खालल्या शिवाय जेवण संपल्यासारखे वाटत नाही. बडीशेपेचा इतिहास मला फारसा माहीत नाही, पण wikipedia वर जे काही वाचलं त्यावरुन असं लक्षात येतं की भारतात खूप प्राचीन काळापासून बडीशेप मुखवास म्हणून वापरली जाते. आणि सध्या बडीशेपेचे अनेक प्रकार मिळतात. बडीशेपेच्या गोळ्या, ज्या चवीला गोड असतात, पुदीन्याचं कवच असलेली minted बडीशेप, वगैरे-वगैरे.

पण बडीशेप खाण्या मागची माझी कारणे थोडी वेगळीच आहेत. वसतीगृहात जेवण झाल्यावर नेहमीच गोड काहीतरी खावसं वाटायचं. म्हणजे एखादं चॉकलेट वगैरे नेहमी खाल्लं जायचं. ह्या विषयावर एकदा चर्चा झाली असता असं लक्षात आलं की जेवण मुळात तिखट असल्याने आणि कुणालाच तिखट खायची सवय नसल्याने ती तिखटाची चव घालवण्यासाठी गोड खाल्लं जातं. त्यानंतर काही दिवसांनी 'हरीश' नामक हॉटेल मधे जेवणाचा योग आला. हा हरीश वाला आम्हाला देवासारखा आहे. मेस मधे जेवायला चांगलं नसलं की आम्ही त्याचाकडे धाव घेतो. तो शरण आलेल्याला कधीही निराश करत नाही. तर, हरीश मधले जेवण नेहमी प्रमाणे मसालेदार होते. जेवण झाल्यावर, बडीशेप खाल्ली (हरीश मधे साधी बडीशेप मिळते) आणि लक्षात आलं की तिखट/मसालेदारपणाची चव गायब झाली. तेव्हा, अचानक (वीज चमकून म्हणा हवं असेल तर) वाटलं की बडीशेपेचा प्राथमिक उपयोग हा मुखातले सगळे चव काढून टाकण्यासाठी आहे(इंग्रजीत 'neutralising traces of any tastes'). त्यावेळी 'निर्वाण' वगैरे म्हणतात ना, तसं काहीतरी मिळाल्या सारखं वाटलं. मुखवास वगैरे हे तिचे secondary उपयोग आहेत. कारण त्या दिवशी मसालेदार जेवल्यावर काहीही गोड खावसं अथवा प्यावसं वाटलं नाही. तेव्हा पासून ठरवलं, की बडीशेपेचा उपयोग मुखवासासारखा न करता, जिभे वरचे सगळे चव neutralise करण्यासाठी करायचा. तर मंडळी, माझं बडीशेप खाण्या मागचं कारण तुमच्या लक्षात आलं असेल.

जाता-जाता.... ह्या हल्लीच्या mint-coated, वगैरे बडीशेपांमधे चव neutralise करण्याची क्षमता नाही. ह्या बडीशेपा खाल्ल्यावर अजून खाव्याश्या वाटतात. खरी बडीशेप म्हणजे ती साधी बडीशेप. आपल्या मुखातुन सगळ्या चवी neutralise करते आणि ती सारखी खावीशी पण नाही वाटत.
बडीशेपSocialTwist Tell-a-Friend

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: